जगातील असमानता (Inequality in the world)

Tribal Mahavikas

एका राजाचा प्रधान जगातील असमानतेच्या प्रश्नाविषयी विचार करीत होता. त्याने राजाला सुचविले की आपल्या राज्यातील असमानता दूर करून सर्व लोकांना समान केले पाहिजे. सध्याची असमानतेची पद्धती हीच बरोबर आहे असे देवाने त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रधानाने मात्र ही पद्धती बदलली पाहिजे असा आग्रह धरला. अशा तऱ्हेने संपत्ती, दर्जा इत्यादी बाबतीत सर्व लोकांना समान करण्यात आले.'

काही दिवसानंतर प्रधानाने एक नवीन घर बांधण्याचे ठरविले. त्याने काही मजुरांना हे काम हाती घेण्यास सांगितले. मजुरांनी विचारले, 'तुम्ही आम्हास किती मजुरी द्याल ?' प्रधानाने उत्तर दिले, 'नेहमीची मजुरी.' मजूर जोराने ओरडले, 'आम्ही का म्हणून काम करावे ? आम्ही आमच्या परीने श्रीमंत आहोत आणि आम्ही सर्व समान आहोत.'

ही गोष्ट घरोघर पसरली. प्रधानाला आपली विचार करण्याची दिशा चुकीची आहे असे आढळून आले. सर्व लोकांत समानता निर्माण करण्यासंबंधी त्याने केलेली चूक फार मोठी होती. ह्यासंबंधी काढलेले आदेश रद्द करण्यात येऊन असमानता पुन्हा प्रस्थापित करण्यात आली. जग असमानतेशिवाय चालू शकणार नाही. सेवा करण्यास व सेवा मागण्यास लोक असले पाहिजेत.