"बोलताना अगर चालतानाही मनुष्याला मृत्यू येईल
सामानाने भरलेली गाडीही उलटी होईल.
निर्दय शब्दाने सख्खा भाऊही ठार होईल
बोलताना अगर चालतांनाही स्त्रीचा मृत्यू घडेल.
स्री गरोदर आहे.
तिच्या मृत्यूची वेळ येईल
मनुष्य झाडावर चढत आहे.
त्याचे हात व पाय निसटले
अग्नीमुळे लाख वितळली
शेपूचा बुंधा वाळून गेला.
लहान वेलीवरून फूल तोडतात
लहान भाजीपाल्याचे झुडूप वाळून जाते.
अशा तऱ्हेने शरीर वाळते
एकाएकी पूर्ण चंद्रोदय होतो.
केळीचा खांब मध्येच मोडतो
मातीचे कच्चे भांडे फुटून जाते.
मातीचे भांडे काही दिवस टिकू शकेल
परंतु शरीर केव्हाही मृत्यू पावेल ह्याच्याबद्दल सांगता येत नाही."